tag:blogger.com,1999:blog-7354601854429452942024-03-13T14:44:22.964-07:00rjunpluggedrjunpluggedhttp://www.blogger.com/profile/05413135814979445845noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-735460185442945294.post-26015882199376581642018-06-14T20:10:00.001-07:002018-06-14T20:10:39.554-07:00आठवणीतले दिवस..<p dir="ltr">रविवार चा दिवस , working असल्यामुळे सुरवात थोडी कंटाळवाणीच झाली. पण आज पुन्हा शाळेत जायला भेटणार म्हणून थोडी excitement होती. सेवा सहयोग तर्फे कर्जत च्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात school kit वाटप चा कार्यक्रम हे निमित्त होते. अभिनव ज्ञान मंदिर ही माझी शाळा. सेवा सहयोग च्या माध्यमातून आज शाळेचा चेहरा खूप बदलून गेलाय! क्रीडा विकास कार्यक्रम शाळेत खूप जोमाने राबवला जात आहे. बास्केट बॉल ग्राउंड पासून ते गोळा फेक थाळी फेक चे सर्व साहित्य शाळेला सेवा सहयोग् ने पुरवले आहे. एक माजी विद्यार्थी म्हणून प्रथम त्याचे खूप खूप आभार. त्या दिवशी शाळेत जाणे झाल्यामुळे शाळेतल्या खूप आठवणी ताज्या झाल्या. शाळेतल्या चौकातले राष्ट्रगीत पासून ते सर्व प्रार्थना झाल्यानंतर केस वाढले असतील तर झिंज्या पकडून बर्वे सर आणि बडे सर ह्यांनी दिलेले पाठीतले फटके पण आठवले. काय शिस्तीतले दिवस होते ते !! केस किती वाढवायचे हे पण शिक्षक ठरवत होते. खऱ्या अर्थाने शिक्षकाचे महत्व त्यांना दिले जायचे. त्यात अगदी एखादा राजकरण्याचा मुला पासून ते लहान सहान पर्यंत सर्व यायचे. आजकाल तर शाळेत जायला सुरवात नाही तर फुटबॉल कट चा हट्ट असतो मुलांचा!! असो.. आता genration पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित ! आठवणी ताज्या होत असताना मुद्दाम मी आमच्या त्या वेळेस असणाऱ्या काही वर्गांत एक चक्कर मारली. 'ड' पासून 'फ' पर्यंत सर्व तुकड्या आठवल्या. ते सर्व मित्र आठवले, डोळ्या समोर अगदी स्पष्ट चित्र येत होते. सध्या पावसाळा चे दिवस म्हणजे ह्या दिवसात शाळा सुरु व्हायची, सुट्टीत क़ाय क़ाय केले ह्या गप्पा रंगायच्या , त्या नवीन वह्यांचा वास, कोणी आधीच्या वर्गातील असतील तर आधीच त्यांचे पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन यायचे. त्यात एखादे वेगळे पुस्तक असेल तर मुद्दाम एकदा शाळेत घेऊन येऊन सर्वांसमोर मिरवायचे. मधल्या सुट्टीत प्रत्येकाच्या डब्यात काय आणले हे जाणून घ्यायची उत्सुकता, मध्येच एकमेकांच्या बापाचा उद्धार करणे, एखाद्याला नाहक त्रास देऊन खूप चिडून देने हे सर्व चालायचे. त्यात जर कोणी मुलीशी बोलताना दिसलाच तर त्याची खैर नसायची अगदी त्याला काही दिवस त्या मुलीच्या नावानेच हाक द्यायची. स्नेहसंमेलन म्हणजे वर्षातले खूप सुगीचे दिवस, त्यात ते चार गट, नेताजी, शिवाजी,रानाप्रताप आणि लाल बहाददूर. ह्यात आपल्या गटाला प्रत्येक खेळात जीव ओतून सपोर्ट असायचं, खेळून सपोर्ट नाही करता आला तरी बाहेरून ओरडून ओरडून चिअर असायचं!! आजकल शाळेच्या बाहेर च वातावरण बघीतल तर हे कुठेच दिसत नाही. फक्त मोबाइल आणि सेल्फी इतकीच काय ते उठून दिसते. असो आता generation पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित !! शिंदे सर त्या दिवशी काही कामा निमित्त शाळेत आले होते त्यांच्याशी भेट झाली, गप्पा झाल्या. बोलताना तिच आदरयुक्त भीती अजूनही मनात असते. त्या वेळेस सारखा शिक्षकांचा धाक आता राहिला नाही हे आताचे शिक्षक पण कबूल करतात, शाळेत पाच मिनिटे जरी उशीर झाला की बडे सर सर्व मैदानावरचा कचरा साफ करायला लावायचे, आम्हाला शाळेत पडलेले फटके घरी समजून द्यायचे नाही हा आमचा प्रयन्त असायचा कारण ते ऐकल्यावर घरातल्यांचे अजून फटके पडायचे, आता मात्र माझ्या मुलावर हात का उगारला ह्या विषयी पालकांची तक्रार असते. असो generation पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित. आता ती तीन दिवसांची सहल जात नाही. सकाळी जाऊन संध्याकाळी परत अशीच सहल चालते, कारणं पण तशीच भयंकर आहेत. असो!<br>
पण आज एकूणच सर्व आठवणी एकदम डोळ्यासमोर येऊन गेल्या. वर्गातल्या त्या बाकां पासून, तुटलेल्या बाकांच्या बॅट बनवून खेळलेले क्रिकेट, प्लास्टिक आणि नंतर स्पंज च्या बॉल ने खेळलेली आबदुबी पासून ते त्या चित्र काढलेल्या भिंति पर्यन्त सर्व काही !!आजही खूप वर्षां नंतर काही जण कधी समोर येतात ; काही ओळखतात, काही ओळखत नाहीत, काही आपल्याला ओळखू येत नाहीत.काहीही असले तरी आठवणी मात्र सर्वांचा काही अंशी समान असतील.</p>
rjunpluggedhttp://www.blogger.com/profile/05413135814979445845noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-735460185442945294.post-31966256868961625152018-06-07T08:57:00.001-07:002018-06-07T08:57:21.483-07:00मन..<p dir="ltr">मन..!! कधी कधी एखाद्या ऐतिहासिक किल्या प्रमाणे मनाची अवस्था झालेली असते. आपण आपल्याच मनात जातो एका चोर वाटेने! हे मन इतकं अवाढव्य आहे की आत शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोर वाट सापडते. त्या चोरवाटेने जाताना अचानक एक नवं दालन उघडतं !! त्यात एक वेगळा खजिना स्वागता साठी सज्ज असतो. त्या दालना जवळ थांबलो की नव्याने शोध लागतो "अरे .. आपल्याला ह्याही विषयात गोडी आहे.." मग काही दिवस ते नवं दालन सोडवावा वाटत नाही . त्याचा आस्वाद घेत काही दिवस आपण तिथेच मुक्काम करतो . पण काही दिवसांनी त्या प्रवासात अजून एक चोरवाट सापडते !! मागच्या प्रवासातली दालनं ह्या प्रवासात लागत नाहीत . पुन्हा मुक्काम ...पुन्हा नवीन दालनं.. पुन्हा हरवणं ... अस किती तरी दिवस चालत.. असच चालत राहत.. कुठे स्थिर व्हावं समजत नाही.. मनातल्या अवाढव्या किल्याला अशी किती दालनं आहेत कळत नाहीत. प्रत्येक दालनं खुणावतं !! आपल्याला इथंही गती आहे हे नव्याने जाणवतं. पण प्रत्येक चोर वाटेच्या बाहेर एक राक्षस आहेच. आपली प्रत्येक चोर वाट.. प्रत्येक दालनं.. समजून घेणारी माणसं प्रवासात आपल्याला भेटली तर सर्व काही ठीक असते.. नाहीतर इतिहासात वाचतो तसा किल्ल्यांवर फक्त हल्ले होत राहतात.. त्यांच्या सौदर्याची फक्त नासधूस होत राहते..</p>
rjunpluggedhttp://www.blogger.com/profile/05413135814979445845noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-735460185442945294.post-66797019182539885772017-12-07T05:52:00.001-08:002017-12-13T22:06:15.675-08:00प्रेम म्हणजे....<p dir="ltr">प्रेम.. खर तर अती महत्वाचा शब्द.. अर्थ समजला तर जपून वापरावा असा... नाहीतर सर्रास वापरतात येणारा.. एखाद्यावर प्रेम करनं किव्हा देणं हे त्या त्या वयानुसार घडत असतं.. पण कोणतीही गोष्ट द्यायची म्हणजे ती पहिली आपल्याकडे असावी लागते.. तसंच प्रेमाचं सुद्धा असलं पाहिजे... आणि जर एखाद्यावर प्रेम करायचं असेल तर ते आपल्याकडे असायला हवं.. <br>
नुकताच एका मित्राशी लग्न ह्या विषयावर गप्पा झाल्या... "आता पर्यन्त 12 मुली बघितल्या पण एक पण पसंद नाही पडली रे" जरा निराश होऊन तो बोलत होता.. एकूण त्याच्या अपेक्षा असणारी मुलगी त्याला आजपर्यन्त मिळाली नाही.तो अजुन थोडया फार मुली बघेलच. म्हणजे इतक्या मुली बघून नंतर त्यातली एक तो सलेक्ट करणार.. आणि लग्न करणार.. त्यानन्तर तिच्या वर खुप प्रेम आहे अस दाखऊंन.. आणि "made for each other..love you"  अशी tagline टाकून fb.. insta वर फ़ोटो upload करणार... ह्यात प्रेम आलेच कुठे ?? मुलींची पण अवस्था तीच.. मुलगा खुप शिकलेला हवा, मुलाकडे स्वतःच घर हवं, कायम नोकरी हवी किव्हा settle busnisess हवा त्यानन्तर दिसायला देखना पण हवा.. आता एवढा सर्व असेल तर त्या नंतर समजून घेणारा हवा.. जर इतकं सर्व त्याच्याकडे 27-28 व्या वर्षापर्यन्त असेल तर अश्या मुलींनी जरा आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारावा की त्यांना हे सर्व कितव्या वर्षी जमले?? एकून आपल्या आपल्या सोईच्या सर्व गोष्टी बघायच्या आणि नंतर जमले तर प्रेम करायचं.. त्यात पण काही मागे पुढे झाला तर separate व्हायचे.. प्रेम हे जर द्यायचे असेल तर समोरच्या कड़े काय आहे हे बघण्यापेक्षा काय नाही हे बघितले पाहिजे....म्हणजे एकाकडे जर काही कमी असेल तर दूसरा ते भरून काढण्याचे आयुष्यभर प्रयन्त करणे यालाच प्रेम म्हणतात...<br>
प्रेम म्हणजे समजली तर भावना.. केली तर मस्करी.. मांडला तर खेळ.. ठेवला तर विश्वास.. आणि निभावलं तर जीवन असते.. शेवटी काय..आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो...</p>
rjunpluggedhttp://www.blogger.com/profile/05413135814979445845noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-735460185442945294.post-88288268288753115562017-11-30T21:01:00.001-08:002017-11-30T21:05:52.554-08:00यशस्वी जीवन म्हणजे नक्की काय?<p dir="ltr">शिस्त हा जीवनामधला अविभाज्य घटक आहे. एक सेकंदने लोकल जाणाऱ्या किव्हा भेटणाऱ्या लोकांना त्याचे महत्व आज चांगलेच समजत असेल! </p>
<p dir="ltr">आज जरी आपल्याला हे वाटत असल तरी लहान असताना आपल्याला शिस्त नको वाटायची!" छड़ी लागे छम छम.. विद्या येई घम घम" अशी ती वेळ होती !!🤣</p>
<p dir="ltr">काल अचानक त्यांना समोर बघून पाय थांबलेच. मी कदाचित तीन- साडेतीन वर्षाचा असताना म्हणजेच शाळेत जायला सुरु केल्यापासून त्यांची ओळख झाली असेल. <br>
शिपाई असल्या तरी मुख्यध्यापकां पेक्षा जास्त दरारा असायचा त्यांचा!! चोवीस- पंचवीस वर्षांनंतर पण अजुन तशाच !! तो ताठरपना, तोच पेहराव, तोच कड़क आणि धड़की भरावणारा आवाज़ !!! अर्थात त्यांनी नावाने ओळखला नसेल मला पण मी थांबलो आणि त्यांची विचारपुस केली. " कशा आहात? , कसा चालू आहे सर्व?" आणि अजुन काही औपचारिक गप्पा झाल्या.<br>
आमच्या शिशुमंदीरच्या "गुरव बाई"!!<br>
  शाळेत असताना आम्ही ज्यांना सर्वात जास्त घाबरत होतो!!! त्यांच्या नावाची धमकी आमच्या सर्व शिक्षकांपासून घरी आई पण द्यायची! साधारणतः लहान मूल  3 ते 8 वर्षाच असताना त्यांच्या अंगात मूल्यशिक्षण रुजवायच काम हे चांगल्या प्रकारे होत असत. त्याच वेळेत गुरव बाईं सारखे शिस्त प्रेमी लोक मिळणे म्हणजे स्वतःला भाग्यवान मानणे अतिशयोक्ति होणार नाही !डब्यात आवडती भाजी असो नसो पण बाईंच्या भीतीने मधल्यासुट्टीत सर्व डबा संपवायला लागायचा. आपल्या जीवनात नआवडत्या  गोष्टी हसत खेळत अगदी रडत का होईना पण पचवण्याची सवय नकळत त्यांनीच लावली असा वाटत कधी कधी! सर्वांच्या डब्यात भाजी पोळी असली पाहिजे ह्या बाबतीत त्या ठाम असायच्या. वेळ आली तर पालकांना पण ठनकाऊन सांगायच्या..."वदनि कवल घेता", " राष्ट्रगीत" तसेच प्रार्थना कींवा वर्गशिक्षिक आले नसतील तर दुसऱ्या वर्गात जाताना तेच काय अगदी "शु" करायला जाताना पण  एका रांगेत जाणे हे सर्व त्यांच्या देखरेखे खाली चालयच. शाळेत असा एक पण विद्यार्थी नसेल जो त्यांना घाबरत नव्हता! </p>
<p dir="ltr">काल त्या दिसल्यावर  बोलायच्या आधी पटकन कानाला लावलेले ear phone काढले अन खिशात घातले. अजुन पण कदाचित मनात तो दरारा कायम आहे !</p>
<p dir="ltr">काही लोक आपल्याला नकळत खुप काही चांगल्या गोष्टी देऊन जातात, आपल्याकडून कसलीही अपेक्षा न करता !! माझ्या मित्रांपैकी काही लोक आता पालक झाले आहेत, त्यांना पुढे गुरव बाईंची आठवण  आल्याशिवाय राहनार नाही हे नक्की !! <br>
लोक जीवनात सफलता फक्त पैशाने मोजत असले तरी माझ्या सारख्या हज़ारो विद्यार्थ्यांना शिस्तिचे धडे देणाऱ्या "गुरव बाईं " सारखे लोक पण जीवनात यशस्वीच आहेत!!<br>
😊😊😊😊😊</p>
<p dir="ltr">_____✒️<br>
May 2, 2017</p>
rjunpluggedhttp://www.blogger.com/profile/05413135814979445845noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-735460185442945294.post-75697293600534794782017-11-30T20:46:00.001-08:002017-11-30T20:47:40.307-08:00सांगा कसं जगायचं<p dir="ltr">आयुष्यात काही गोष्टी आपल्याला जबरदस्त नुकसान देऊन जातात. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात की नाही हा विचार करण्याचा वेळपण नसतो आपल्याकडे, एकदम वादळ येते आणि आपण बांधलेले 'स्वप्नांचे' घर क्षणात मातीत मिळून जाते. स्वप्न मोडल्याचे दुःख नसते खर तर, पण पुन्हा स्वप्न बघायची ताकद आणि विश्वास ह्या गोष्टी परत कुठून आणायच्या? <br>
झालेल्या घटनांसाठी स्वतः ला जबाबदार धरायचे झाले आणि 'जशास तसे' असा पकड़ल तर ह्या गोष्टी आपल्या बरोबर होतील आजवर इतका वाईट कोणाचा केल्या सारखा आठवत नाही. शेवटी काय चांगला-वाईट असा मुळात काही असतो असा वाटत नाही.<br>
आणि मग अचानक लक्षात येत, ह्या सर्व कोलहालात आपल अस्तित्वच पूसुन गेलय.. इतक सर्व बदलत असताना फार गृहीत धरून घेतल सगळेच.. <br>
आणि अचानक निवांत बसलेला असताना जाणवतो कळणं आणि कळून घेण् ह्यातला फरक !!<br>
काही गोष्टी कळून पण कळून घेतल्या नाहित तर कधी तरी कळून घ्याव्याच लागतात.. हेच जगण असत! <br>
अश्या वेळेस जगायच कस हा प्रश्न उरतो..<br>
थोड्या फार फरकाने सर्वांच जगण हे असच असत.. </p>
<p dir="ltr">पाडगावकरांची एक सुंदर कविता आठवते...</p>
<p dir="ltr">कळ्याकुट्ट कळोखात<br>
जेव्हा काही दिसत नसतं<br>
तुमच्या साठी कोणीतरी<br>
दीवा घेऊन उभं असतं<br>
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं<br>
तुम्हीचं ठरवा!</p>
<p dir="ltr">पेला अर्धा सरला आहे<br>
असं सुद्धा म्हणता येतं<br>
पेला अर्धा भरला आहे<br>
असं सुद्धा म्हणता येतं<br>
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं<br>
तुम्हीचं ठरवा!</p>
<p dir="ltr">शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं<br>
तुम्हीचं ठरवा!</p>
<p dir="ltr">सांगा कस जगायचं?<br>
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत<br>
तुम्हीचं ठरवा!</p>
rjunpluggedhttp://www.blogger.com/profile/05413135814979445845noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-735460185442945294.post-61211494473878195042016-10-02T01:19:00.001-07:002017-11-30T20:48:32.147-08:00आज परत एकदा सैराट ........ <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="font-size: x-large;">आज परत एकदा सैराट ........ </span><br />
<div>
<blockquote class="tr_bq">
<span style="font-size: x-large;"><br /></span></blockquote>
</div>
<div style="text-align: justify;">
<blockquote class="tr_bq">
<b> आज रविवार असल्यामुळे जरा उशिरा उठलो, सर्व आटोपून एका कामासाठी घराबाहेर पडलो , तेवढ्यात रस्त्यावरच्या एका घरा जवळ नुकत्याच खूप गाजणाऱ्या " सैराट " चं गाणं कानावर पडलं , पुढे जाऊन बघितलं तर ९ ते १० वर्ष वयोगटातील ५-६ मुलं मोठ्या जोशाने अन एक मुखानें बोलत होती</b><b> " समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई,कधी होशील तू माझ्या लेकराची आई " ,त्यांचा तो जोश आणि उत्साह बघून मला नवलच वाटले. काय समजत असेल मुलांना ह्या गाण्याचा अर्थ? पण तरी ते पूर्ण ताल आणि सुरामध्ये गात होते. </b></blockquote>
</div>
<div style="text-align: justify;">
<blockquote class="tr_bq">
<b> आपल्या मराठी मध्ये व काही प्रमाणात हिंदी मध्ये पण गडद विचाराचा काही दाखवला कि त्याला लोक उचलून घेतात , खूप चांगला आहे , विचारात प्रगल्भता आली पाहिजे त्यात वाद नाहीच . पण सैराट ला प्रसिद्धी भेटून आपल्याला काय मिळाले ? प्रत्येक लहान मुला पर्यंत सैराट विषयीची नको नको ती गोष्ट पोहचली आणि काही चॅनेल ते अजून पण पोहचवण्याचे सत्कर्म करत आहेत...सैराट मध्ये आर्ची लग्नाच्या वयाची दाखवली असली तरी प्रत्येकाला माहित आहे ती इयत्ता ९ वी मध्ये आहे ,सैराट चे गाणीं म्हणणारे ५ वी , ६वी ची मुलं गुढग्याला बाशिंग बांधतायत मग आता ह्याचा परिणाम आपल्या शाळेतल्या मुलींवर झाल्याशिवाय राहील असा वाटत नाही. </b></blockquote>
</div>
<div style="text-align: justify;">
<blockquote class="tr_bq">
<b> बरं नागराज ला सामाजिक सुधारणां वर प्रकाश टाकायचा होता असा माणून थोडा विचार करू कि नक्की काय सुधारणा झाल्या व होतील सैराट बघुन ? अन तसा दाखवायचाच होत तर ९ वी मधली आर्ची भेटली हे सर्व दाखवायला? म्हणे तिची ऑडिशन घेतली बुवाने !!! म्हणजे अक्ख्या महाराष्ट्रात त्याला हि रिंकूच भेटली !!!! त्या १३-१४ वर्ष्याच्या मुलीला, जीला काय चांगले काय वाईट हे अजून समजायचे आहे तिला ह्या झगमगाट ढकलले ह्या पठयानें. ज्या झगमगाटाने किती लोकांचा बळी घेतलाय हे आपल्याला माहीत आहेच कि !!!! ह्या इवल्याश्या जीवाला ह्या झगमटात आणून तिची पुढच्या सर्व आयुष्यात तिला हाच फेम भेटेल ह्याची जबाबदारी घेतील का हे समाज सुधारक ? कि सोडून देतील तिला वाऱ्यावर त्या वर वर सुंदर वाटणाय्रा भकास दुनियेत, जिया खान असो वा आनंदी असो व इतर, आपण त्यांची परिस्थिती बघितलीच ना? फेम असताना डोक्यावर घेऊन नाचणारे लोक नंतर विसरून जातात आणि ह्या फेम ची सवय लागलेली हि तरुण वयाचे कलाकार मंडळी नंतर लोकांचे लक्ष कमी झाले कि दडपणाखाली येतात अन नको ते करतात !!! </b></blockquote>
</div>
<div style="text-align: justify;">
<blockquote class="tr_bq">
<b> फिल्म चा विषय खूप चांगला होता, आपल्या समाजामध्ये असणाऱ्या घाणेरड्या विचार प्रवृत्तीवर प्रकाशा आणणारा होता ,पण ह्या वाईट प्रवृत्तीं वर प्रकाश पडण्याऐवजी, कोणत्या गोष्टीवर पडला वा पैसे वसूल करण्यासाठी मुद्दाम आणला गेला...... ९ वी शिकणाऱ्या आर्चीवर ? तिच्या किंवा इतर लोकांच्या अशुद्ध मराठीवर ? आर्ची आणी परश्याच्या वैयक्तिक जीवनावर ? घरच्यांचा विरोध असणाऱ्या प्रेम संबंधांवर ? </b></blockquote>
</div>
<div style="text-align: justify;">
<blockquote class="tr_bq">
<b> आता मुद्द्याचं बोलायचं झालं तर समाज सुधारणा करायच्या असतील तर त्याला बरेच मार्ग आहेत, काही लोक स्वतःला समाज सुधारक दाखवून स्वतःच्या सुधारणा घडवून आणतात हे तर दिसतेच, बस झालं आता सैराट चा गोंधळ,नागराजजी आणि झी मराठी ला एक विनंती आहे कि समाजाला सुधारायचा राहू दे फक्त एक आश्वासन आम्हाला द्या कि ह्या इतक्या लहान वयातील मंडळींना आणून इतके पैसे कमावले ना ? मग आता त्यांची जबाबदारी पण घ्या , सैराट ची 'झिंग ' कमी झाली कि ह्यांचे भविष्य वाऱ्यावर नका सोडू , इतका केला तरी खूप झाले... आणि बालकामगारांना विरोध असणाऱ्या आपल्या कायद्याने आणि so called सेन्सॉर बोर्ड ने पण लहान वयाच्या मुला मुलीं ना काय भूमिका द्यायच्या ह्यावर लक्ष द्यायला हवे असे वाटते ... नाही तर आज पर्यंत " रोगापेक्षा इलाज भयंकर " ह्या पद्धतीने जसे चालते तसेच चालत राहील...</b></blockquote>
</div>
<div style="text-align: justify;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: justify;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: justify;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: justify;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: justify;">
</div>
</div>
rjunpluggedhttp://www.blogger.com/profile/05413135814979445845noreply@blogger.com0