Thursday, November 30, 2017

सांगा कसं जगायचं

आयुष्यात काही गोष्टी आपल्याला जबरदस्त नुकसान देऊन जातात. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात की नाही हा विचार करण्याचा वेळपण नसतो आपल्याकडे, एकदम वादळ येते आणि आपण बांधलेले 'स्वप्नांचे' घर क्षणात मातीत मिळून जाते. स्वप्न मोडल्याचे दुःख नसते खर तर, पण पुन्हा स्वप्न बघायची ताकद आणि विश्वास ह्या गोष्टी परत कुठून आणायच्या?
झालेल्या घटनांसाठी स्वतः ला जबाबदार धरायचे झाले आणि  'जशास तसे' असा पकड़ल तर ह्या गोष्टी आपल्या बरोबर होतील आजवर इतका वाईट कोणाचा केल्या सारखा आठवत नाही. शेवटी काय चांगला-वाईट असा मुळात काही असतो असा वाटत नाही.
आणि मग अचानक लक्षात येत, ह्या सर्व कोलहालात आपल अस्तित्वच पूसुन गेलय.. इतक सर्व बदलत असताना फार गृहीत धरून घेतल सगळेच..
आणि अचानक निवांत बसलेला असताना जाणवतो कळणं आणि कळून घेण् ह्यातला फरक !!
काही गोष्टी कळून पण कळून घेतल्या नाहित तर कधी तरी कळून घ्याव्याच लागतात.. हेच जगण असत!
अश्या वेळेस जगायच कस हा प्रश्न उरतो..
थोड्या फार फरकाने सर्वांच जगण हे असच असत..

पाडगावकरांची एक सुंदर कविता आठवते...

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

No comments:

Post a Comment